अक्कलकोट:”लोकशाही प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच मजबूत होत असते आणि मतदान हा त्याचा मुख्य कणा आहे,” असे प्रतिपादन सचिन कल्याणशेट्टी व शांभवी कल्याणशेट्टी यांनी केले. वव अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी आपल्या धर्मपत्नीसह मतदानाचा हक्क बजावला.
चपळगाव जिल्हा परिषदेच्या उमेदवार शांभवी सचिन कल्याण शेट्टी व अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी लोकशाहीच्या या महापर्वात उत्साहाने सहभाग घेतला. मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थिरतेसाठी नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे आणि जबाबदारीने आपले मत नोंदवले पाहिजे. लोकशाहीच्या मूल्यांना बळ देण्यासाठी आणि तालुक्याचा विकास साधण्यासाठी मतदानाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. यावेळी त्यांनी तालुक्यातील सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले.लोकशाहीचा उत्सव, आमचा सहभाग!
